२६/११ चा मुंबई वरचा अतिरेकी हल्ला प्रत्यक्ष पाहून आल्यावर लिहिलेली कविता…
एक महात्मा त्या दिवशी
तीन माकडे कुरवाळीत बसला होता
काफिरांनी तेव्हाच त्याचा
चष्मा चोरुन नेला होता
स्वातंत्र्याचा दिवस होता
तिरंगा उंच फडकत होता
भगव्या, हिरव्या, निळ्या कापडात
महामा मात्र गुदमरत होता…
गोऱ्याऐवजी काळा आज
देश खरवडून काढतो आहे
स्वीसमध्ये महात्म्याला
जबरदस्तीने धाडतो आहे
मागच्या चौकटीत महात्मा
तरीदेखील हसत असतो
टेबलाखालचा हात
त्याला बहुदा दिसत नसतो
‘भारत माझा देश आहे’ची प्रतिज्ञा घेतांना
म्हणूनच हात आज थरथरतो आहे
कारण स्वार्थासाठी लोकांनी
माझ्या देशाचा आत्मा विकायला काढला आहे..!
True that!